सोलापूर : प्रतिनिधी
श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील व्यापारी, कामगारांची थकीत देणी देण्याकरीता महाराष्ट्र शासनाच्या थकहमीवर एनसीडीसी संस्था, नवी दिल्ली यांच्याकडून 347 कोटी 67 लाख रूपये मिळाले. परंतु कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) आमदार अभिजीत पाटील यांनी सदरची रक्कम व्यापारी आणि कामगार यांना दिली नाही. त्यांनी 347 कोटी 67 लाख रूपयांचा गैरव्यवहार केला असुन सदरची रक्कम मिळण्यासाठी पुण्यातील साखर आयुक्तालय कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे, अशी माहिती व्यापारी संतोष माणिक भालेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाना (वेणूनगर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील व्यापारी आणि कामागारांच्या थकीत देणी संदर्भात श्रमिक पत्रकार संघात 23 मे रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ए-वन एंटरप्रायजेस-पंढरपूरचे संतोष माणिक भालेराव यांनी अभिजीत पाटील आणि संचालक मंडळासह साखर आयुक्त आणि लेखापरिषक यांच्यावर गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत पुढे भालेराव म्हणाले, श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील जवळपास 50 व्यापारी आणि 200 कामगारांची थकीत देणी देणे आहे. यासाठी या कारखान्यास 347 कोटी 67 लाख रूपये कर्ज मिळाले आहे. मात्र कर्ज मिळूनही अद्यापही व्यापारी आणि कामागरांची देणी दिली नसुण सदरच्या 347 कोटी 67 लाख रूपये रकमेचा दुरूपयोग केला आहे. याच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मात्र अद्यापही रक्कम मिळाली नाही. याला श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याचे चेअरमन तथा आमदार अभिजीत पाटील, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, साखर आयुक्त आणि लेखापरिक्षक हे सर्व जबाबदार आहेत. तरी व्यापाऱ्यांचे 59.75 कोटी आणि कामगारांचे 41.87 कोटी रूपये त्वरीत मिळावे. कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्यावर प्रशासकाची नेमणुक करावी, श्री. विठ्ठल सह. साखर कारखानचे चेअरमन अभिजीत पाटीलख, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक, दोषी अधिकारी यांच्यावर फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांची वैयक्तीक मालमत्ता जप्त करून त्यांच्याकडून दुरूपयोग केलेली रक्कम वसुल करावी, आदी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेस केशव शेळके, सुखदेव काळे, आण्णाराव काळे, विलास कदम, सत्यवान माळी आदी उपस्थित होते.
पुणे येथील साखर आयुक्तालय कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
सदरच्या विविध मागण्यांसाठी 50 व्यापारी आणि 200 कामगारांकडून येत्या 26 मे 2025 रोजी पासुन पुणे येथील साखर आयुक्तालय (साखर संकुल) कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती व्यापारी संतोष माणिक भालेराव यांनी दिली.
सर्वांगीण निरोगी महाराष्ट्रासाठी आरोग्य विभागाला सर्वोत्परी सहकार्य करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
चौकशी समितीकडून कोंडेकर यांचा अहवाल सादर; आठ दिवसात कारवाईचे संकेत