भव्य महारोजगार मेळाव्यात 2 हजार 674 नावनोंदणी तर 946 उमेदवारांना दिले थेट नियुक्ती पत्र
चिखली : प्रतिनिधी
18 Crore Jobs : मोदी सरकारच्या काळात देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला असुन राजकारण करतांना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे क्रमवार गरजेचे ठरते. 2014 च्या निवडणुकी दरम्यान दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन प्रधानमंत्री पदावर आरूढ होण्यापूर्वी मोदींनी दिले होते. मात्र गत 9 वर्षाच्या कार्यकाळात सुमारे 18 कोटी बेरोजगारांना रोजगाराच्या आश्वासनांची मोदी यांनी पुर्तता न केल्याने मोदींना आश्वासनांचा विसर पडल्याचा घनघनाती आरोप बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी आयोजित महारोजगार मेळाव्या प्रसंगी केला. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणुन प्रदेष काँग्रेसचे सरचिटणीस शामभाउ उमाळकर यांच्यासह असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती.
अभियांत्रीकी महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रात आपल्या प्रगती आलेखाचा उच्चाक गाठुन कार्याचा ठसा उमटविणा-या अनुराधा अभियांत्रीकी महाविद्यालय तथा माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे मित्र मंडळाच्या वतीने आज दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी भव्य महारोजगार मेळावा 2023 चे मौनीबाबा संस्थान चिखली येथे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यात 50 हुन अधिक नामांकित कंपन्यांचे विभाग प्रतिनीधींनीच्या उपस्थितीत 2 हजार 674 नाव नोंदणी करण्यात आली. पैकी 946 उमेदवांराना तात्काळ नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी व्यासपिठावर विष्णु पाटील कुळसुंदर, सुधाभाउ धमक, दिपक देशमाने, समाधान सुपेकर, कुणाल बोंद्रे, सौ. ज्योतीताीई पडघान, अशोकराव पडघान, डॉ. सत्येंद्र भुसारी, सचिन बोंद्रे, प्रदिप हाके, प्राचार्य डॉ. अरून नन्हई, विजय जागृत, उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर, डॉ. संजय घुगे, रामधन मोरे यांची उपस्थिती होती.
हे ही वाचा : सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ : रविकांत तुपकर
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिमोट कंट्रोलव्दारे दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करून मेळाव्यात सहभागी झालेल्या विविध कंपन्यांचे विभाग प्रतिनिधी यांना स्मृती चिन्ह देवून गौरविण्यात आले. तर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अतहरोद्यीन काझी यांच्या बहिण कौसर बी. रा. दारव्हा यांना सामुहिक श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्ष्ठि व रूपरेषेची सविस्तर मांडणी अनुराधा अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरून नन्हई यांनी आपल्या प्रास्तावीकातुन विषद केली. यावेळी सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष दिपक देशमाने, तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर, नागपुर येथील विभाग प्रतिनिधी धिरज ठाकरे, कौस्तुभ यांची समयोचित भाषणे झाली.
हे ही वाचा : डोंगरशेवली गट ग्रामपंचायत सरपंच पदी वैशाली जवंजाळ
यावेळी राहुलभाउ पुढे म्हणाले, कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या दुरदृष्टीतुन उभारण्यात आलेल्या विविध शैक्षणीक संस्था सुसिस्थीत व प्रगती पथावर असल्याने गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणाच्या वाटा मोकळया झाल्या. काळया मातीत राबणा-या शेतकरी, शेतमजुरांची मुले देशासह परदेशात नोक-या करत असल्याने त्यांना रोजगार उपलब्ध झाल्याचा पालकांच्या चेह-यावरील आनंद पाहुन आपणास समाधान लाभते. देशात बेरोजगारी वाढत असुन शेतक-यांची तसेच देशवासियांची आर्थीक परिस्थीती अत्यंत खालावली आहे. मोदींनी अच्छेदीनचे दाखविलेले स्वप्न अदानी,अंबानी सारख्या उद्योगपतींना मोठे करीत आहे तर लघु उद्योग धंदे मात्र ठप्प झाले असुन मोठमोठया महत्वाच्या कंपन्या, 16 बंदरे व कोळषांच्या महत्वाच्या खानी विकल्या गेल्या. देशात मनमोहसिंग सरकार असतांना 450 कोटी रूपयांचे कर्ज मोदी सरकारच्या काळात 22.50 लाख कोटी रूपये झाले असुन देश आर्थीक दरीत कोसळला आहे. परिणामी बेरोजगारी वाढत आहे. देश हितास्तव लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी भारत वासियांवर येवुन ठेपली असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
या मेळाव्याला जिल्हासह चिखली मतदार संघातील 10 वी 12 वी, आय.टी.आय., विविध शाखेतील पदविधर,अभियंते तथा सर्व सुषिक्षीत तरूण-तरूणीं मोठया संख्येने सहभागी झाले होते. या महारोजगार मेळाव्यात टाटा मोर्ट्स, आयसीआयसीआय बॅक, महेंद्रा, टाटा बॅटरीस्, एसएम ऑटो, बजाज, दिशा इंजि.कंपनी, एम.ए.एस.ओ., व्हीओवेब आयटी, कॅबॅरॉथोन, अबॅको कॉम्पुटरर्स, इत्यादीसह अभियांत्रीकी क्षेत्राशी निगडीत आय.टी., बॅंकींग, उत्पादन क्षेत्र, रिटेल, agricultural, फायनान्स, बी फॉर्म, नर्सिंग, लॉजीस्टीक्स, एफएमसी, नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी निवड करण्यात आलेल्या 946 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र देण्यात आले. कमवा आणि शिका या तत्वावर पुणे, औरंगाबाद आदि महानगरांमध्ये टाटा कंपनीमध्ये भोजन निवास, बस सेवा, निषुल्क सुविधा देत 15 ते 35 हजार रूपये दरमहा वेतनावर नियुक्त करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उन्मेष जोषी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी केले. मेळाव्याला उपस्थितांसाठी चहा,फराळ व जेवनाची उत्कृष्ठ व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमासाठी विष्णु पाटील कुळसुंदर, पांडुरंग पाटील भुतेकर, सुधाभाउ धमक, दिपक देशमाने, समाधान सुपेकर, कुणाल बोंद्रे, सौ. ज्योतीताीई पडघान, अषोकराव पडघान, डॉ. सत्येंद्र भुसारी, सचिन बोंद्रे, ज्ञानेष्वर सुरूशे, शाम पठाडे, प्रदिप हाके, रामदास मोरे, प्रदिप पचेरवाल, विजय जागृत, उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर, किषोर सोळंकी, डॉ. संजय घुगे, प्रकाष सपकाळ, रामधन मोरे, विजय शेजोळ, शेख जाकीर, जितु मुळावकर, प्राचार्य डॉ. के.आर.बियाणी, प्राचार्य डॉ. काळे, प्राचार्य डॉ.रमेश पागोरे, अनुराधा अर्बनचे नितीन गायके, हिरकणी महिला अर्बनचे संदिप भावसार, रिकी काकडे, डॉ. अमोल लहाने, रविअण्णा काळे, डॉ. आर.बी. इंगळे, जनार्दन कापसे, ज्ञानेष्वर पचांगे,समाधान आकाळ यांची उपस्थिती होती. 18 Crore जॉब्स
हे ही वाचा : एक कोटीची लाच, MIDC तील सहाय्यक अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात