भाजप रणछोडदास!, 2014 नंतर देश निर्माण झाला म्हणणारे स्वत: ला रामापेक्षा मोठं मानतात का?

Source : Google

राममंदिराच्या उद्घाटन होणार आहे. इथं उद्धव ठाकरे यांना बोलावण्यात आलं नाही. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.  

Source : Google

भाजप रणछोडदास असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. 2014 नंतर देश निर्माण झाला म्हणाणारे स्वत: ला रामापेक्षा मोठं मानतात का?, 

Source : Google

असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसंच गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेलाही संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. 

Source : Google

कोण काय म्हणतंय. कोण काय सांगतंय… ही चटण्या लोणची आहेत. भाजपकडे त्यांच्या लोकांकडे फार लक्ष देणं गरजेचं नाही. कारण इतिहास साक्षीला आहे. 

Source : Google

इतिहास आणि भाजपचा काहीही संबंध नाही. देशाचा इतिहास घडवण्यामध्ये मग तो देशाचा स्वातंत्र्यलढा असेल. मुंबईचा लढा असेल. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल. 

Source : Google

आयोध्या आंदोलन असेल. देशातील कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात ही लोक नव्हती. त्यामुळे यांना दुसऱ्यांविषयी पोटदुखी आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.